महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

एनआरसी वसाहत धोकादायक ठरवल्याने कामगार संतप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी –  कल्याण डोंबिवली महापालिकेने मोहने येथील एनआरसी कॉलनी मधील सर्व इमारती धोकादायक असल्याचे दर्शवून रहिवासी कामगारांच्या कुटुंबियांना एनआर व्यवस्थापनकरवी भर पावसात विस्थापित करण्यासाठी नोटीसा बजावल्या असल्याचा आरोप आयटक संलग्न कामगार युनियने केला असून हि नोटीस मागे घ्यावी यामागणीसाठी आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालय वडवली येथे आयटक युनियनतर्फे कामगारांचा मोर्चा काढण्यात आला.

एनआरसी व्यवस्थापनाने कामगारांचे थकबाकीचे रास्त हिशोब न देता तसेच मनपाचे कर प्राविइडंट फंडाची आणि महसूल खात्याची दंडाची रक्कम न भरता सर्व कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करून आणि कोर्टाने दिलेल्या आदेशांचे पालन न करता ४००एखर जमिनीचा कब्जा घेऊन त्यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु केलेले आहे. मोहने येथील एनआरसी कॉलनीतील कामगारांची घरे रिकामी करण्याविरुध्दचा एनसीएलएटी दिल्ली यांचा मनाई हुकूम असतानाही इमारती धोकादायक ठरवून घेऊन सुरक्षेचं कारण दाखवून घरे रिकामी करून कामगारांचे थकबाकीचे कायदेशीर हिशोब न देता रहिवाशांना हुसकावून लावण्याचा अदानी व्यवस्थापनाला डाव साध्य करायचा असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे.

त्या करिता‌ सुस्थीतित आसतांनाही कामगारांच्या सदनिका काबिज करण्यासाठी धोकादायक ठरविण्यात येत आहेत व कोर्टात नोटीस दाखल करुन मनाई हुकूम शिथील करण्यासाठी अर्ज देखील केला गेला आहे.  या षडयंत्रात  केडीएमसी प्रशासनाने मदतरुप ठरू नये व नोटीस मागे घ्यावी यासाठी मनपाच्या अ प्रभाग वडवली कार्यालयवर आयटकच्या वतीने आज  भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर महिलांचा समावेश होता. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य आयटकचे उपाध्यक्ष कॉम्रेड उदय चौधरी, राजेश त्रीपाठी,  धनराज गायकवाड, श्रीकांत कांबळे, रोहित सोनावणे, प्राजक्ता कुळधर्म, फरीदा पठाण, शेवाळे आदी युनियन कार्यकर्त्यांनी केले.

 मनपा प्रशासनातर्फे अ प्रभागचे उप अभियंता इनामदार यांनी  मोर्चा समोर निवेदन स्वीकारले. मंगळवारी दुपारी या विषयावर संबंधितांची बैठक बोलावली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »