महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image पोलिस टाइम्स लोकप्रिय बातम्या

राष्ट्रपतींनी भारतीय पोलीस दलातील प्रशिक्षणार्थींच्या ७४ व्या तुकडीला केले संबोधित

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 27 डिसेंबर 2022 रोजी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत (एसव्हीपीएनपीए) झालेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय पोलीस दलातील प्रशिक्षणार्थींच्या 74 व्या तुकडीला संबोधित केले.

भारतीय पोलीस दलातील प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना, राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, पोलीस दल ही सरकारची सर्वाधिक  दृश्य यंत्रणा आहे. जेव्हा पोलीस दल जनतेचा विश्वास संपादन करते तेव्हा त्यातून सरकारची प्रतिमा अधिक उज्ज्वल होत असते. आणि जेव्हा अधिकाऱ्यांपासून अगदी शेवटच्या हवालदारापर्यंत संपूर्ण पोलीस दल सावधानता, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा  यांचे दर्शन घडविते तेव्हाच त्या पोलीस दलाला सामान्य जनतेकडून सन्मान आणि विश्वास मिळतो असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच भारतीय पोलीस दलातील प्रशिक्षणार्थींनी नेतृत्वगुण जोपासले पाहिजेत.  

या प्रशिक्षणार्थींनी भारतीय पोलीस दलाच्या अखंडता, निःपक्षपातीपणा, धैर्य, स्पर्धात्मकता आणि संवेदनशीलता या पाच मूलभूत गुणांची आठवण ठेवावी आणि कृतीतून त्यांचे दर्शन घडवावे असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला.

समाजात ज्यांच्या मताला फारसे महत्त्व नाही अशांच्या दुरवस्थेबाबत अधिक संवेदनशील राहण्याचा सल्ला त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला. त्या म्हणाल्या की, देशाच्या अत्यंत दुर्गम कोपऱ्यात राहणाऱ्या अशिक्षित, गरीब माणसाला तेथील स्थानिक पोलीस ठाण्याकडून सहानुभूतीपूर्वक मदत मिळेल याची सुनिश्चिती पोलीस अधिकाऱ्यांनी करून घेतली पाहिजे. पोलीस दलाची अशी जरब हवी की पोलिसांचा विचार मनात येताच गुन्हेगारांचा भीतीने थरकाप झाला पाहिजे. त्याच वेळी, सर्वसामान्य नागरिकाने मात्र पोलिसांकडे एक मित्र आणि रक्षणकर्ता म्हणून पाहिले पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली.

आपल्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांच्या धर्तीवर, अमृत काळात आपण स्वतःसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यात नारी शक्तीला खूप महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे असे त्यांनी सांगितले.त्या म्हणाल्या की, महिलांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागामुळे अधिक उत्तम प्रकारे समग्र विकास साधता येतो. आपण आता महिला सक्षमीकरणाच्या टप्प्याकडून  महिलांच्या नेतृत्वाखाली विकास घडविण्याकडे वेगाने मार्गक्रमण केले पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »