महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

केडीएमसीच्या आयुक्तपदी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य शासनाकडून डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे (आय ए एस) यांची आज नियुक्ती करण्यात आली. आज संध्याकाळी राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.

केडीएमसीचे मावळते आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामांमुळे त्यांची कारकीर्द लक्षवेधी अशी ठरली. आयुक्तपद स्विकारल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्या लोकाभिमुख कामाची चुणूक दाखवून दिली. कोवीड काळात तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारलाही घेण्यास भाग पडले. कोवीड काळ असूनही कल्याण डोंबिवलीतील विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षे रखडलेल्या विविध विकासकामांना त्यांनी केवळ गतीच दिली नाही, तर कित्येक कामे पूर्णत्वासही नेली. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीकरांच्या मनामध्ये केडीएमसी प्रशासनाबाबत निर्माण झालेला अविश्वास आणि नकारात्मक छबी बदलण्यात डॉ. विजय सुर्यवंशी यांचा मोलाचा वाट आहे . तसेच पूर्वी वेगवेगळ्या दिशेला तोंड असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही त्यांनी आपल्या कार्यशैलीच्या बळावर एकत्र आणत त्यांच्यामध्ये शहरांबाबत आपुलकी निर्माण केली.

तर नवनियुक्त आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनीही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कामाची छाप पाडली आहे. अनेकविध योजना आणि प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा कारभार ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीला विकासाच्या मार्गावर नेतील आणि सामान्य नागरिकांना न्याय देतील अशी अपेक्षा त्यांच्या कडून आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »