महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

प्रभाग रचना हा शिवसेनेचा केविलवाणा प्रयत्न – भाजपचा शिवसेनेला टोला

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – केडीएमसीच्या प्रभाग रचनेवरून मनसेपाठोपाठ आता भाजपनेही शिवसेनेवर टीकास्त्र डागले आहे. आपले अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरून शिवसेनेने केलेला हा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. यावेळी चव्हाण यांनी प्रभाग रचना, 27 गावं, प्रशासन, भूमिपुत्र यांसह शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारांवरही भाष्य करत जोरदार हल्ला चढवला.

आगामी केडीएमसी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. त्यापाठोपाठ निवडणूक प्रचारापूर्वीच राजकीय पक्षांकडून आरोप – प्रत्यारोपाच्या फैरीही झाडण्यास सुरुवात झाली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रभाग रचनेवरून शिवसेनेवर गंभीर आरोप केल्यानंतर आज भाजपनेही याबाबत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर आरोपांची राळ उठवली. कल्याण डोंबिवली महापालिकेची झालेली ही प्रभाग रचना प्रशासनाला हाताशी धरून करण्यात आली आहे. आपल्याच पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांनी केल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला.

तर या प्रभाग रचनेमूळे भाजपला असुरक्षित वाटण्याचा कोणताच प्रश्न नाहीये. भाजप हा देशातील सर्वात मोठा आणि पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. आणि केडीएमसी निवडणुकीतही भाजप आपले अव्वल स्थान कायम राखेल असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा शिवसेनेला विसर…
भाजपसोबत सत्तेमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र महाविकास आघाडीसोबत सध्या सत्तेमध्ये असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज होऊ नये शिवसेनेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आता सोयीस्कररित्या विसर पडल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. इतकेच नव्हे तर डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा प्रभागही आताच्या रचनेतून शिवसेनेने गायब केल्याचे सांगत शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टिकाही आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, मंदार हळबे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »