महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

नंदुरबार बाजार समितीत मिरचीच्या व्यापारातून ३५० कोटीची उलाढाल

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

https://youtu.be/Mve9JInzajw?si=qm8DzvYX5J9as1JK

नंदुरबार/प्रतिनिधी – फळे, भाज्या येण्याचा एक विशिष्ठ हंगाम असतो. पण मिरची ही एकमेव आहे जी वर्षभर बाजारात विकली जाते. मिरची जेवणाची चव वाढवते. त्यामुळे विविध पद्धतीने तिचा जेवणात वापर केला जातो. म्हणूनच की काय यंदा नंदुरबार बाजार समितीत मिरचीची आवक वाढल्याचे चित्र आहे.

नंदुरबार बाजार समितीत यावर्षी मिरचीने विक्रमी आवक केली आहे. गेल्या 10 ते 15 वर्षातील ही आवक सर्वात जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबारचे मिरची मार्केट हे महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश राज्यात देखील प्रसिद्ध आहे. मिरचीच्या या आवकमुळे जवळपास 350 कोटी रुपयांची उलाढाल बाजार समितीत झाली आहे.

दरवर्षी बाजार समितीमार्फत 40 ते 50 मिरची पथाऱ्या उभारण्यात येत होत्या, परंतु यावर्षी 70 ते 80 मिरची पथाऱ्या उभारण्यात आल्या आहेत. जवळपास रोज 700 ते 800 वाहनातून मिरची विक्री होत होती आता मिरची हंगाम अंतिम टप्प्यात आला असून एप्रिल पर्यंत हंगाम संपत असतो. परंतु आता देखील 80 ते 100 वाहनातून जवळपास 1000 ते 1500 क्विंटल मिरचीची विक्री बाजार समितीत होत आहे. त्यामुळे मिरचीचे मार्केट तेजीत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना कापूस व पपई या पिकांपासून पुरेसा भाव न मिळाल्याने नुकसान झाले होते. त्यामुळे येत्या हंगामात शेतकरी मिरची उत्पादनाकडे वळतील. तसेच यामुळे जवळपास दीडपट मिरची लागवडीचे क्षेत्र वाढेल अंदाज बाजार समितीकडून वर्तवण्यात आला आहे.

Related Posts
Translate »