महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी

रायगड मधून आसामला निघाली २९ मजुराची सायकल वारी सरकार कडे मदतीसाठी हाक

    प्रतिनिधी.
    कसारा – करोनाने सगळी कडे हाहाकर माजवला आहे. देशभर लॉकडाऊन झाले आहे. त्यामुळे खूप प्रश्न निर्माण झाले आहे. सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे हातावर पोट भरणाऱ्या परराज्यातून आलेल्या मजुराचा हे मजूर आपल्या व आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. करोनामुळे सर्व उद्योग धंदे बंद पडले आहे त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. आसाच एक २९ मजुराच्या ग्रुप आसाम मधून रायगड येथील नशनल डिझाईनर डिस्प्ले या फर्निचर च्या कंपनी मध्ये लोडिंग आणि पंकिंग चे काम करत होता. लॉकडाऊन मुळे काम बंद झाले व उपासमारीची वेळ त्याच्या वर आली. नोकरी गेल्यामुळे आता आमच्याकडे खाण्यापिण्यासाठी पैसे नाही,घरभाडे भरण्यासाठी पैसे नाही म्हणून आता घरी जाण्याचा निर्णय आम्हाला घावा लागलाय असे ते मजूर सागतात. दुसरा कोणताच मार्ग नसल्यामुळे प्रवासासाठी साधनही उपलब्ध न झाल्यामुळे शेवटी २९ मजुरांनी रायगड मधील पेन वरून आसामला सायकल चालवत जाण्याचा निर्णय घेतला. व २८०० किलोमीटर असलेल्या आसाम प्रवासाला ते निघाले आहे. अडीच दिवसात ते कसारा घाटा पर्येंत पोहचले आहे. एका दिवसाला हे लोग ९० किलोमीटर चे अंतर कापायचे व नंतर मिळेल तिथे आराम करून पुढे निघायचे असे त्यांनी ठरविले आहे. जर आसाच प्रवास राहिला तर ते ३० दिवसात आसाम ला पोहचतील अशी आशा या मजुरांना वाटते. सरकार ने आम्हाला काही मद्दत करावी अशी आमची सरकार ला विनंती आहे असे ते मजुर बोलतात.
    मे महिन्यात रखरखत्या उन्हात हे २९ मजुर कसलीही पर्वा न करता आपल्या घरी पोहचण्यासाठी २८००किमी प्रवास तो हि सायकल वर करून पोहतील कि नाही हि एक शंकाच आहे. असाच एक मजूरांचा ग्रुप घर जाण्याच्या प्रवासाच्या वेळी औरंगाबाद जवळ निघाला असता रेल्वे रुळावर त्याच्यासोबत अपघात झाला होता व त्या मध्ये १६ मजूर मृत्यूमुखी पडले होते. आता हेही मजुर एवढ्या मोठ्या प्रवासाला निघाले आहे. त्यामुळे सरकार ने यांना वेळीच गाढून त्याच्या घरवापसीची व्यवस्था करावी जेणे करून ते आपली घरी सुखरूप पोहचतील.

    Related Posts
      Translate »