महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

समृद्धी महामार्गाच्या कामात गर्डर कोसळून १७ जण ठार

नेशन न्यूज मराठी टीम.

शहापुर/प्रतिनिधी – शहापुर तालुक्यात समृद्धी महामार्ग सरलांबे येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे समृद्धीचे गर्डर कोसळून १७ जण ठार तीन जखमी.टीडीआरएफ़ टिम शहापुर घटनास्थळी पोहचुन रेस्क्यू करण्यास सुरूवात.
शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन व गर्डर कोसळले. या घटनेत आतापर्यंत १७ मजूर मयत झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ ची टीम व अग्निशमन सह इतर टीम उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व महसूल प्रशासन घटनास्थळी उपस्थित आहेत.रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दुर्घटनेच्या निमित्ताने नागरिकांच्या मनात आनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे समृद्धी महामार्ग हा जर सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तर प्रत्येक वेळी एवढ्या मोठ्या दुर्घटना कशा होतात? त्याचा साठी पुरेपूर काळजी का घेतली जात नाही? किवा सरकारने ज्या यंत्रांना समृद्धी महामार्गाचे काम दिलेआहे त्या तेवढ्या सक्षम आहेत का? असे ना ना प्रकारचे प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे. कारण दुर्घटना आणि सततचे अपघात कुटुंबचे कुटुंब उद्वस्त करीत आहे.

सरकारने जरी मृताच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली असली तरी माणसाच्या जीवनाचे मोल एवढे कमी असू शकते का? त्याच बरोबर जर यंत्रणांनी पुरेपूर काळजी घेतली असती तर आज १७ कुटुंब उघड्यावर पडले नसते.

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे, असे ठणकावत सांगणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे.आणि त्याच दिवशी कष्टकरी श्रमिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी घेला हि बाब खूप लाजिरवाणी आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »