महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश मुख्य बातम्या

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १,३५१ उमेदवार रिंगणात

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – लोकशाही असलेल्या भारत देशात लोकसभा निवडणुकीचे स्थान फार महत्वाचे आहे. कारण जनतेच्या मतावर देशाचे भविष्य अवलंबून आहे. निवडणुकीच्या प्रचारात नेतेमंडळी नागरिकांना मोठ-मोठी आश्वासने देत आहेत. पण निवडणूका झाल्यानंतर त्यांना स्वतःची आश्वासने आठवतील का? जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असेल का? अशा असंख्य प्रश्नांनी गरीब जनतेच्या मनात घर केलंय.

लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यात देशभरातील 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1351 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील निवडणूक स्थगित करण्यात आलेल्या 29-बैतुल (एसटी) या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या 8 उमेदवारांचा देखील समावेश आहे. तसेच गुजरातमधील सुरत मतदार संघातून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत 19 एप्रिल 2024 रोजी संपली. दाखल झालेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर 1563 अर्ज वैध ठरले.

तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी गुजरातमधील 26 लोकसभा मतदारसंघांतून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज सादर झाले. त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघांतून 519 उमेदवारी अर्ज सादर झाले. महाराष्ट्रामध्ये 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राज्यातील सर्वाधिक 77 उमेदवारी अर्ज दाखल झाले तर त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 5-विलासपूर लोकसभा मतदारसंघात 68 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या सर्व 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारी मागे घेण्यासाठी 22 एप्रिल 2024 पर्यंतची मुदत होती.

Related Posts
Translate »