महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे ताज्या घडामोडी

वाहतुक कोंडी टाळुन पादचा-यांना प्राधान्याने जागा देणे आवश्यक – आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़

WWW.nationnewsmarathi.com

कल्याण/प्रतिनिधी – वाहतुक कोंडी टाळुन पादचा-यांना प्राधान्याने जागा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी आज केले. कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या गरजेच्या अनुषंगाने सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे, वाहतुक कोंडी कमी करणे, पार्किंग धोरण, सिग्नल यंत्रणा या बाबी संदर्भात मा.स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. या बैठकीस शहर वाहतुक ठाणेचे पोलीस उपायुक्त डॉ. विजय राठोड, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक, वाहतुक व्यवस्था, आरटीओचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे व महापालिकेचा संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता.

स्टेशन परिसरात रिक्षांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते, त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, वाहतुक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक बनवुन पार्किंग (P1, P2) रिक्षा स्टॅन्ड याबाबत धोरण ठरविण्यात यावे. जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. शहरातील सिग्नल यंत्रणा सुरळीतरित्या कार्यान्वित ठेवण्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा यांनी आपापसात समन्वय ठेवावा आणि जास्त प्रमाणात वाहतुक कोंडी होणा-या ठिकाणी व वेळी सिग्नलसाठी वेळेचे स्लॉट ठरवुन द्यावेत, अशाही सूचना आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी दिल्या.

गर्दीच्या ठिकाणी मुख्यत: मार्केट परिसरात पे ॲन्ड पार्क योजना चालु करावी, अशा सूचना ठाणे वाहतुक शाखेचे उपायुक्त डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. संदर्भात पोलीस विभागाने यासाठी संबंधित परिसर निश्चित करुन द्यावा, जेणेकरुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी दिले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »